
तळेगाव दाभाडे शहरात पाण्याचा अनियंत्रित अपव्यय; रहिवाशांमध्ये नाराजी, नगरपरिषदेकडे तातडीची मागणी
तळेगाव दाभाडे :शहरातील मारुती मंदिर चौक, जिजामाता चौक, कडोलकर कॉलनी तसेच इतर अनेक रहिवासी भागांमध्ये गेल्या काही दिवसांपासून पाण्याचा मोठ्या प्रमाणावर अपव्यय होत असून नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.


विशेषतः मारुती मंदिर चौकामध्ये सलग तिसऱ्या दिवशी रस्त्यावर पाणी साचल्याने तीन महिला दुचाकी घसरून जखमी झाल्या. सकाळच्या गर्दीच्या वेळी हा परिसर अनेकदा घसरडा होत असून अपघातांची शक्यता अधिक वाढली आहे.


नव्याने जोडण्यात आलेल्या पाणी कनेक्शनमध्ये गंभीर तांत्रिक त्रुटी असल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे. पाइपलाइनमधून सतत गळती होत असल्याने स्वच्छ पाणी रस्त्यावर वाहत आहे. यासोबतच काही नागरिक सकाळी रस्ते धुण्यासाठी घरगुती पाणी वापरून अनावश्यक अपव्यय करत असल्याचेही दिसून येत आहे.
सततच्या गळतीमुळे महानगरपालिका पुरवठ्यावरही ताण येत असून पाण्याचे दुर्भिक्ष्य असलेल्या हंगामात अशी परिस्थिती चिंताजनक ठरत आहे.
स्थानिक नागरिकांनी तळेगाव नगरपरिषदेकडे तातडीने लक्ष घालून गळती दुरुस्त करण्याची, तसेच पाणी अपव्यय रोखण्यासाठी जनजागृती मोहीम राबवण्याची मागणी केली आहे.


“नगरपरिषदने त्वरित उपाययोजना करून पाण्याचा अनावश्यक अपव्यय थांबवावा, अन्यथा परिस्थिती आणखी गंभीर होऊ शकते.
प्रतिनिधी=गणेश नामदेव भेगडे.मो९९२१८०७०११























