कामशेत ग्रामस्थांचा महावितरण च्या विरोधात यलगार.१३ ऑगस्टला मोर्चाचे आयोजन
कामशेत : शहरात अनेक दिवसापासून वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने नागरिकांचे नुकसान होत आहे. त्यामुळे शहरातील नागरिक अक्षरशः हैराण झाले आहेत. महावितरणाच्या समस्या वर चर्चा करण्यासाठी बुधवार दिनांक ६ ऑगस्ट २०२५ रोजी शहरातील गणेश मंगल कार्यालयात नागरिकांची वीज ग्राहक संघटनेच्या वतीने बैठक पार पडली.
यावेळी वीजपुरवठा वारंवार खंडीत होणे. अधिक बिल येत असल्याचा आरोप. देयक दुरुस्तीसाठी वडगावला पाठविणे. पन्नास वर्षांपूर्वीचे खांब आणि वायरिंग जुने झाले आहेत त्यामुळे ते बदलणे. कमी जास्त विद्युत दाबामुळे घरातील उपकरणे नादुरुस्त होणे. शहरात विद्युत पुरवठा लोणावळा किंवा मुंढावरे येथुन सुरू करावा. ग्राहकांबरोबर असभ्य बोलणाऱ्या अधिकाऱ्यांची बदली करणे. कार्यालयात २४ तास सेवा प्रतिनिधी असणे. खेडचे मुख्य कार्यालय मावळ तालुक्यात असावे असा विविध मागण्या या बैठकीत करण्यात आल्या.
शहरातील नागरिक यावेळी महावितरणच्या कारभाराबाबत एकवटले असून प्रशासनाच्या कारभाराविरोधात नागरिकांनी यलगार केला असून बुधवार दिनांक १३ ऑगस्ट २०२५ रोजी शहरातील सर्व व्यवहार बंद ठेवून महावितरण कार्यालयावर सकाळी १०: वाजता मोर्चा काढण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.
यावेळी सरपंच रुपेश गायकवाड, माजी सरपंच अभिमन्यू शिंदे, कामगार नेते भरतभाई मोरे, व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष विलास भटेवरा, तानाजी दाभाडे, निलेश दाभाडे, रोहिदास वांळुज, परेश बरदाडे, विष्णू गायखे, गुलाब तिकोने, सचिन रावळ, राजू लोणकर, अतुल कार्ले, सुरेश जाधव, रमेश सुतार, बाळासाहेब गायखे, तुकाराम गायखे, दत्तात्रय शिंदे. युवराज शिंदे, लक्ष्मण बालगुडे, रमेश लुणावत, भाऊ गायकवाड, कोडिबा रोकडे, सुधीर विर, सतीश इंगवले, विजय दौडे, राजू वेदमुथा, दिलिप पवार, यांच्यासह कामशेत ग्रामस्थ. व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रतिनिधी =गणेश नामदेव भेगडे. ९९२१८०७०११




















