मावळ मधील वाकसई येथे मराठा समाज बांधवांची बैठक संपन्न
लोनावळा : मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर पुन्हा एकदा लढ्याचा एल्गार करत मराठा समाज बांधवांनी शुक्रवार दिनांक २९ ऑगस्ट२०२५ रोजी मुंबईकडे कूच करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. या मोर्चाचे नेतृत्व मराठा आंदोलक मनोज जरंगे पाटील करणार असून, त्याच्या पार्श्वभूमीवर लोणावळा शहर व ग्रामीण मराठा समाज बांधवांची नियोजन बैठक वाकसई येथील जगद्गुरू संत तुकाराम महाराज पादुका स्थान येथे उत्साहात पार पडली.या बैठकीत मोर्चा यशस्वी होण्यासाठी नियोजन, प्रचार आणि मराठा समाजाच्या व्यापक सहभागावर भर देण्यात आला.
विशेषतः मावळ तालुक्यातील सर्व मराठा बांधवांना मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्यानुसार तालुक्यातील प्रमुख केंद्र कान्हे फाटा येथे एकत्रित बैठक होणार असून, त्यासाठी समाजबांधवांमध्ये जागृती मोहीम राबविण्यात येणार आहे.तसेच एक ऑगस्ट २०२५ रोजी मराठा आरक्षण लढ्याचे नेतृत्व करणारे मनोज जरंगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आई एकविरा देवीला अभिषेक करण्याचा कार्यक्रमही आयोजित करण्यात आला आहे.
बैठकीत बोलताना काही वक्त्यांनी २९ ऑगस्टचा मोर्चा हा मराठा समाजाच्या न्याय्य हक्कांसाठी निर्णायक ठरणार असून, राज्य सरकारवर दबाव निर्माण करण्याच्या दृष्टीने तो महत्त्वपूर्ण टप्पा असेल, असे मत व्यक्त केले.
प्रतिनिधी =गणेश नामदेव भेगडे. ९९२१८०७०११






















