ग्रामीण भागातील १००० विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य व खाऊवाटप करण्यात आले
नवलाख उंब्रे : भूमिपुत्र संघर्ष समितीचे संस्थापक. अध्यक्ष ॲड. सागर एकनाथ शेटे यांच्या वतीने मावळ तालुक्यातील नवलाख उंब्रे, बधालवाडी, मिंडेवाडी, जाधववाडी, शेटेवस्ती, कोयतेवस्ती, चावसरवस्ती आणि पारिटवाडी येथील जिल्हा परिषद शाळांमधील तब्बल १००० विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य व खाऊ वाटप करण्यात आले.
याप्रसंगी भाजपा युवा मोर्चा विद्यार्थी आघाडी पुणे जिल्हा उपाध्यक्ष रामनाथ शेटे, महेश शेटे, राजू शेटे, संतोष शेटे, सुरेश पडवळ, स्वप्नील शेटे, शत्रुघ्न शेटे, दत्ता शेटे, नवनाथ पडवळ, अमोल पडवळ, सोपान शेटे, बाळू पडवळ, बाळू पारधी, सोमनाथ पडवळ, विक्रम शेटे, दिपक पडवळ, देविदास शेटे यांसह गावातील ग्रामस्थ, पालक आणि शालेय समिती सदस्यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.
अॅड सागर शेटे यांच्या या स्तुत्य उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद पाहायला मिळाला. शालेय पिशव्या, वह्या, पेन्सिल, पेन आदी साहित्याबरोबरच लाडू, चिवडा, बिस्किटे यांसारख्या खाऊचेही वितरण करण्यात आले.स्थानिकांनी ॲड. सागर शेटे यांच्या सामाजिक कार्याचे कौतुक करत त्यांचे आभार मानले. अशा उपक्रमांमुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळून शिक्षणाबद्दलची आवड वाढते, असे मत ग्रामस्थांनी व्यक्त केले.अॅड सागर शेटे यांच्या या उपक्रमाचे कौतुक सर्वत्र होत आहे.
प्रतिनिधी =गणेश नामदेव भेगडे. ९९२१८०७०११




















