पिंपरी चिंचवड : जगद्गुरू संत श्री तुकाराम महाराजांच्या पवित्र पालखीचे सोमवारी सकाळी 10 वाजता मोशी येथे बारणे कुटुंबाच्या वतीने भव्य स्वागत करण्यात आले.
या वर्षी संत तुकाराम महाराज आषाढी वारी पालखी सोहळ्याचा ३४० वा वर्ष होता. सलग ३५ दिवसांच्या आध्यात्मिक यात्रेनंतर, तब्बल १७ वर्षांनी आळंदी येथे दुसऱ्यांदा मुक्काम करून पालखीने मोशी नगरीत प्रवेश केला. यावेळी प्रसिद्ध बैलगाडा मालक सिताराम बारणे, अनंता बारणे, प्रसिद्ध उद्योजक संतोष बारणे, उद्योजक आतिश बारणे, उद्योजक शिवाजी बारणे, उद्योजक सचिन बारणे, उद्योजक अक्षय बारणे यांच्या कुटुंबीयांनी पालखीचे मोठ्या भक्तिभावाने स्वागत केले. या ऐतिहासिक सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी हजारो भाविक, वारकरी आणि स्थानिक ग्रामस्थ उत्साहात सहभागी होते.
यावेळी बारणे कुटुंबाच्या वतीने आलेल्या सर्व वारकरी बंधू भगिनींना चहा पाणी नाष्टा देण्याची व्यवस्था करण्यात आली होती.
पुंडलिक वरदे हरि विठ्ठल…” या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला. मंडपात मानकरी, सेवेकरी, दिंडीचालक यांचा श्रीफळ व प्रसाद देऊन बारणे कुटुंबाच्या वतीने सन्मान करण्यात आला. यावेळी सोहळा प्रमुख ह.भ.प. दिलीप महाराज मोरे, जालिंदर महाराज मोरे, गणेश महाराज, वैभव महाराज, विक्रमसिंह महाराज, उमेश महाराज, लक्ष्मण महाराज मोरे, शशी मोरे आणि इतर मान्यवर व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.




















