धामणे ग्रामस्थांचा रिगरोड व टिपी स्कीम ला ठाम विरोध. रिगरोड व टिपी स्कीम मुळे तब्बल २०हजार टन ऊसक्षेत्र बांधित होणार
सोमाटणे : मावळ तालुक्यातील धामणे येथे पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरण (PMRDA) मार्फत प्रस्तावित ६५ मीटरचा रिंगरोड आणि नियोजित दोन टीपी स्कीम राबविण्याच्या निर्णयाला ग्रामस्थांनी विशेष ग्रामसभेत ठाम विरोध दर्शवला.ग्रामस्थांच्या मागणीनुसार ग्रामपंचायत धामणे यांच्या वतीने विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले.
सभेत शेतकऱ्यांच्या हिताला बाधक ठरणाऱ्या या रिंगरोड आणि टीपी स्कीमबाबत सविस्तर चर्चा झाली. सर्व उपस्थितांनी एकमुखाने या योजनांना विरोधाचा ठराव संमत केला.यावेळी सरपंच अश्विनी गराडे, उपसरपंच रेखा लोहोर, सदस्य अविनाश गराडे, अविनाश गराडे, प्रदीप गराडे, सोमेश पाटील गराडे, दीपाली गराडे, सारिका गराडे, अँड. अंजना आढाळगे, ग्रामपंचायत अधिकारी विराज पवार, कर्मचारी नंदकुमार गराडे, पप्पू गराडे आदींसह अरुण गराडे, बाबुलाल गराडे, नंदकुमार गराडे, अतुल गराडे, आनंदा मधुकर गराडे, माजी सैनिक दत्तात्रय गराडे, सतीश गराडे, गणेश गराडे, रवींद्र गराडे, तुषार गराडे आणि शेकडो ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गावातून दरवर्षी कासारसाई येथील संत तुकाराम महाराज सहकारी साखर कारखान्यास तब्बल २० हजार टन ऊस जातो, मात्र रिंगरोड आणि टीपी स्कीममुळे मोठ्या प्रमाणावर ऊसक्षेत्र बाधित होणार असल्याची शेतकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
या योजना पूर्णपणे रद्द कराव्यात, अशी मागणी ग्रामस्थांनी ठामपणे मांडली.सभेत ठरविण्यात आले की, या विरोधाचा ठराव व निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त, महानगर आयुक्त व PMRDA यांना पाठविण्यात याव्यात. योजना रद्द न झाल्यास धामणे ग्रामस्थांकडून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा यावेळी देण्यात आला.
प्रतिनिधी =गणेश नामदेव भेगडे. ९९२१८०७०११




















