पवना धरण ७० टक्के भरले शाखा अभियंता रजनीश बारिया दिली माहिती
पवनानगर : मावळ तालुक्यातील पवना धरणात ७० टक्के पाणीसाठा झाला आहे. मागील वर्षी याच कालावधीत (४ जुलै) केवळ ३२५ मिमी पावसाची नोंद झाली होती, तर यंदा आतापर्यंत १०५२ मिमी पावसाची नोंद झाली. पावसात तब्बल तिपटीने वाढ झाली. त्यामुळे पाणीसाठ्यातही घसघशीत वाढ झाली आहे.
यावर्षी सध्या धरणात मागील वर्षाच्या तुलनेत सुमारे ५० टक्के अधिक पाणीसाठा आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवड शहर व मावळ तालुक्याच्या पवना धरणावर अवलंबून असलेल्या परिसरात पिण्याच्या पाण्याची समस्या दूर झाली आहे. पावसाचा सध्याचा जोर पाहता जुलै महिन्यातच पवना धरण १०० टक्के भरण्याची शक्यता असल्याची माहिती शाखा अभियंता रजनीश बारिया यांनी दिली आहे.
दरम्यान, लोणावळा व मावळ परिसरात मागील महिनाभरापासून मुसळधार पावसाचा सिलसिला सुरू असून मावळ तालुक्यातील बहुतांश धरणे पूर्ण क्षमतेने भरण्याच्या अंतिम टप्प्यावर आहेत.
प्रतिनिधी =गणेश नामदेव भेगडे. ९९२१८०७०११



















