आरक्षण कोणतेही असो… जनतेच्या मनात एकच नाव — प्रशांत दादा भागवत!
मावळ (प्रतिनिधी): कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसतानाही, केवळ समाजकार्य, लोकसंपर्क आणि लोकाभिमुख कार्यपद्धतीच्या जोरावर अल्पावधीतच लोकांच्या मनात स्थान निर्माण करणारे नाव म्हणजे प्रशांत दादा भागवत. जिल्हा परिषद निवडणुकीत इच्छुक उमेदवार म्हणून उदयास आलेले प्रशांत दादा आज मावळ तालुक्यातील प्रत्येक गावात, प्रत्येक घरात परिचित झाले आहेत.

आमदार सुनील अण्णा शेळके यांचे विश्वासू आणि कार्यसमर्थक म्हणून त्यांची ओळख असली, तरी सामाजिक, सांस्कृतिक आणि क्रीडा क्षेत्रातील उपक्रमांमुळे त्यांनी स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे.
प्रशांत दादांचा साधेपणा, नम्रता आणि मनमिळावूपणा हेच त्यांच्या लोकप्रियतेचे रहस्य आहे. कोणत्याही स्तरातील व्यक्तीशी सहज संवाद साधण्याची त्यांची पद्धत जनतेच्या मनात आपुलकी निर्माण करते. “आपलेपणा” हा त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा केंद्रबिंदू असून, प्रत्येक गावात ते ‘आपले दादा’ म्हणून ओळखले जातात.

समाजातील सर्व घटकांशी नातं जोडण्यासाठी त्यांनी विविध क्षेत्रांमध्ये उपक्रम राबवले आहेत.
धार्मिक-सांस्कृतिक मूल्यांचा प्रसार: कीर्तन सोहळ्यांद्वारे समाजात श्रद्धा, संस्कार आणि एकतेचा संदेश दिला.
खेळाडू घडविण्याचे व्यासपीठ: प्रशांत दादा भागवत स्पोर्ट्स फाऊंडेशन मार्फत क्रिकेट, खो-खो यांसारख्या स्पर्धांचे आयोजन केले. या स्पर्धांमुळे ग्रामीण भागातील खेळाडूंना संधी आणि प्रोत्साहन मिळाले.
महिला सक्षमीकरण उपक्रम: ‘सौभाग्यवती मावळ 2025’ या आगळ्यावेगळ्या उपक्रमातून महिलांना आत्मविश्वास आणि व्यक्तिमत्त्व सादरीकरणाचे व्यासपीठ दिले.
महिलांच्या आणि ग्रामस्थांच्या आरोग्याची काळजी घेत प्रशांत दादांनी विविध मोफत आरोग्य शिबिरांचे आयोजन केले. ग्रामीण भागात डॉक्टर आणि तज्ज्ञ सेवा उपलब्ध करून देण्यात त्यांचा पुढाकार महत्त्वाचा ठरला.
विद्यार्थ्यांसाठी त्यांनी प्रेरणादायी व्याख्यानमाला आणि करिअर मार्गदर्शन सत्रे आयोजित केली, ज्यातून तरुण पिढीला दिशा मिळाली

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना सलाम करत भीम जयंती उत्सव साजरा करून त्यांनी समता, बंधुता आणि सामाजिक न्यायाचा संदेश दिला.
त्याचप्रमाणे मनोरंजन संध्या आणि कुंकुमार्चन सोहळे अशा उपक्रमांद्वारे महिलांच्या सहभागाला प्रोत्साहन देत, त्यांच्या योगदानाचा गौरव केला.
आज मावळ तालुक्यात “प्रशांत दादा भागवत” हे नाव विकास, सेवा आणि विश्वासाचे प्रतीक बनले आहे.
राजकीय घराण्याचा आधार नसतानाही, केवळ जनतेशी असलेले आत्मीय नाते, प्रामाणिक कार्यपद्धती आणि पारदर्शकता यांच्या जोरावर त्यांनी स्वतःची एक मजबूत ओळख निर्माण केली आहे.
आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मावळातील लोकांमध्ये प्रशांत दादांविषयीची सकारात्मक भावना आणि विश्वासाचा पाया अधिक दृढ झाला आहे. जनसंपर्क, कार्यतत्परता आणि सामाजिक बांधिलकी — हेच त्यांचे सर्वात मोठे बळ ठरले आहे.




















