कामशेत ग्रामस्थांनी दिली मोर्चाची हाक. महावितरण ला आली जाग. महावितरण करून देखभाल दुरुस्ती सुरू
कामशेत : शहरात सतत खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्यामुळे नागरिक अक्षरशः हैराण झाले आहे. अधिक बिल येत असल्याचा महावितरण वर आरोप होत आहे. देयक दुरुस्तीसाठी वडगावला पाठविणे. पन्नास वर्षांपूर्वीचे खांब आणि वायरिंग जुने झाले होते आदी समस्या कामशेत मध्ये महावितरणच्या आहेत.या संदर्भात ६ ऑगस्ट २०२५ रोजी कामशेत येथील गणेश मंगल कार्यालयात नागरिकांची वीज ग्राहक संघटनेच्या वतीने बैठक आयोजित करण्यात आली होती.
या बैठकीत नागरिकांनी १३ ऑगस्ट २०२५ रोजी शहरातील सर्व व्यवहार बंद ठेवून महावितरण कार्यालयावर मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला या मोर्चाची दखल घेत महावितरण ने कामशेत मध्ये तातडीने बैठक घेऊन सुधारणा कामांना सुरुवात केली आहे.
यासंदर्भात माहिती देताना महावितरणचे उपकार्यकारी अभियंता राहुल परदेशी म्हणाले की कामशेत शहरातील जुने वीज वितरण बॉक्स व तारा बदलण्याचे काम पूर्ण झाले असून छत्रपती शिवाजी महाराज चौकातील खांबांच्या लोंबकळलेल्या तारा काढून लवकरात लवकर अंडरग्राउंड तारा टाकण्यात येणार आहेत. तसेच चिखलसे येथे जागेची उपलब्धता झाल्यानंतर लगेच सब स्टेशनचे काम सुरू करण्यात येईल. सध्या यंत्रणेच्या प्राथमिक दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे.
प्रतिनिधी =गणेश नामदेव भेगडे. ९९२१८०७०११




















