तळेगावातील रस्त्यावर अंधाराचे साम्राज्य
तळेगाव दाभाडे : शहरातील प्रमुख वर्दळीच्या रस्ता मारुती मंदिर चौक ते लिंब फाटा या रस्त्यावर तळेगाव दाभाडे नगरपरिषदेने बसवलेले पथदिवे गेल्या १५ दिवसापासून बंद अवस्थेत आहेत. शहरातील या प्रमुख रस्त्यावर अनेक दुकाने असून हा रस्ता वर्दळीचा असून या रस्त्याने अनेक नागरिक पायी व वाहनाने जात असतात. असे असताना मात्र या रस्त्यावरील पथदिवे गेल्या १५ दिवसापासून बंद असल्याने येथील नागरिकांना अंधाराचा सामना करावा लागत आहे.
अंधारामुळे जर काही दुर्घटना घडली तर याला जबाबदार कोण ? असा प्रश्न येथील नागरिक उपस्थित करत आहेत. नगरपालिकेने त्वरित या रस्त्यावरील बंद पथदिवे चालू करावे. व नागरिकांची या अंधारापासून मुक्तता करावी. या संदर्भात बोलताना दिनेश जोगदंड या व्यवसायिकांनी सांगितले की या रस्त्यावरील पथ दिवे बंद असल्याने या रस्त्यावर अंधाराचे साम्राज्य आहे. केवळ दोन ते तीनच पथदिवे चालू आहे. अन्य पथदिवे हे बंद अवस्थेत आहेत.
यामुळे पालिका प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराचे दर्शन घडत आहे. याच रस्त्याच्या जवळ तळेगाव दाभाडे नगरपालिकेची इमारत देखील आहे. असे असताना पालिका प्रशासनाला या रस्त्यावरील बंद पथदिवे दिसत नाही का? नगरपालिकेने या रस्त्याच्या कडेला असलेले बंद पथदिवे त्वरित सुरू करावे. अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे.
प्रतिनिधी = गणेश नामदेव भेगडे.९९२१८०७०११




















