देशाच्या प्रगतीत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा मोठा वाटा. चंद्रकांत शेटे यांचे प्रतिपादन
नवलाख उंब्रे : भारत देशाच्या जडणघडणीमध्ये व प्रगतीत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा मोठा वाटा असल्याचे प्रतिपादन इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेचे कार्यवाह चंद्रकांत शेटे यांनी व्यक्त केले.शैक्षणिक वर्ष २०२४ – २५ मध्ये इयत्ता दहावीची परीक्षा यशस्वीरित्या उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ श्रीराम विद्यालय, नवलाख उंब्रे येथे उत्साहात पार पडला. त्याप्रसंगी चंद्रकांत शेटे बोलत होते.शेटे पुढे बोलताना म्हणाले की, ग्रामीण भागातील विद्यार्थी सामाजिक,सांस्कृतिक मूल्य प्रस्थापित करणारे आहेत.
संघनिष्ठ भावनेने विद्यार्थी आपल्या जीवनाला आकार देऊ शकतात. ग्रामीण विद्यार्थीच यशाचे भवितव्य आहे.असे गौरवोद्गार शेटे यांनी काढले.यावेळी पंचायत समितीचे माजी सभापती निवृत्ती शेटे,शाळा समिती अध्यक्ष सुरेश शेटे, तसेच अनिल नरवडे, संतोष नरवडे, सोपान नरवडे, राजेंद्र कडलक,महेश शेटे, अरुण शेटे,सागर शेटे, शत्रुघ्न शेटे,दत्ता शेटे, प्रकाश शेटे,पांडुरंग कोयते, जालिंदर शेटे, प्रभाकर पडवळ, नारायण जाधव .तसेच पालक आणि ग्रामस्थ वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. या समारंभात यशस्वी विद्यार्थ्यांना सन्मानपत्रे व स्मृतिचिन्हे देऊन गौरविण्यात आले.
विद्यार्थ्यांनी केवळ गुणांच्या मागे न लागता आपल्या आवडीच्या क्षेत्रात जिद्द,चिकाटी,मेहनतीने पुढे जावे असे आवाहन इंद्रायणी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.संभाजी मलघे यांनी केले.
प्रतिनिधी =गणेश नामदेव भेगडे. ९९२१८०७०११




















