महायुतीचे उमेदवार जाहीर; मावळ तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी गटनिहाय चेहरे निश्चित
मावळ तालुक्यातील आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी भारतीय जनता पार्टी व शिवसेना (शिंदे गट) महायुतीने आपले उमेदवार अधिकृतपणे जाहीर केले आहेत. तालुक्यातील पाचही जिल्हा परिषद गटांसह पंचायत समितीच्या दहा गणांसाठी अनुभवी, स्थानिक पातळीवर कार्यरत व जनतेशी थेट संपर्क असलेल्या उमेदवारांना संधी देण्यात आल्याने महायुतीने विकासकेंद्री लढतीचा निर्धार व्यक्त केला आहे.
जिल्हा परिषद गटनिहाय उमेदवार महायुतीने जिल्हा परिषदेसाठी सर्व गटांमध्ये ताकदीचे उमेदवार उतरवले आहेत.
टाकवे बु. – नाणे गटातून मधुकर लहू कोकाटे, वराळे – इंदोरी गटातून मेघा प्रशांत भागवत, खडकाळा – कार्ला गटातून आशा बाबुराव वायकर, कुसगाव – काले गटातून दत्तात्रय शंकर गुंड तर सोमाटणे – चांदखेड गटातून शितल अविनाश गराडे यांना महायुतीची उमेदवारी देण्यात आली आहे.
पंचायत समिती गणनिहाय उमेदवार पंचायत समितीच्या दहा गणांसाठी भाजप व शिवसेना (शिंदे गट) यांच्यात समन्वय साधत उमेदवार निश्चित करण्यात आले आहेत.
टाकवे बु. गणातून अश्विनी सोमनाथ कोंडे (शिवसेना), नाणे गणातून संगीता ज्ञानेश्वर आधारी, वराळे गणातून रवींद्र निवृत्ती शेटे, इंदोरी गणातून श्रीकृष्ण अण्णासाहेब भेगडे, कार्ला गणातून रंजना सुरेश गायकवाड, खडकाळा गणातून प्रकाश बाबुराव गायकवाड, कूसगांव गणातून नवनाथ पांडुरंग हारपूडे, काले गणातून सीमाताई मुकुंद ठाकर, सोमाटणे गणातून बाळासाहेब नथू पारखी व चांदखेडे गणातून सुवर्णा घोटकुले यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
यावेळी उमेदवार जाहीर करताना आयोजित पत्रकार परिषदेस भाजपाचे निवडणूक प्रमुख बाळासाहेब नेवाळे, कोअर कमिटी अध्यक्ष निवृत्ती शेटे, शिवसेना (शिंदे गट) जिल्हाप्रमुख राजू खांडभोर, भाजपाचे ज्येष्ठ नेते अविनाश बवरे, माजी सभापती गुलाबराव म्हाळसकर, माजी उपसभापती शांताराम कदम, शरद हुलावळे, कामशेत–खडकाळा मंडल अध्यक्ष अभिमन्यू शिंदे यांच्यासह महायुतीचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विकासाचा अजेंडा पुढे महायुतीने जाहीर केलेल्या उमेदवारांच्या यादीत महिला, अनुभवी नेतृत्व व नव्या चेहऱ्यांचा समतोल राखण्यात आला आहे. ग्रामीण विकास, पाणीपुरवठा, रस्ते, आरोग्य, शिक्षण व शेतीपूरक सुविधा या मुद्द्यांवर भर देत निवडणूक लढवली जाणार असल्याचे यावेळी नेत्यांनी सांगितले. उमेदवार जाहीर होताच तालुक्यातील राजकीय वातावरण तापले असून महायुतीच्या प्रचाराला वेग आला आहे.




















