पवना बंद जलवाहिनीला मावळ तालुका शिवसेनेचा तीव्र विरोध. जलवाहिनी कायमचीच रद्द झाली पाहिजे
येळसे : मावळ तालुक्यातील पवना धरणातून बंद पाईपलाईनने पिंपरी चिंचवड शहराला पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी रद्द करावी यासाठी ९ ऑगस्ट २०११साली मावळ मधील शेतकऱ्यांनी आंदोलन केले होते. यावेळी पोलिसांनी केलेल्या अमानुष गोळीबारात मावळ मधील शेतकरी कांताबाई ठाकर, मोरेश्वर साठे, शामराव तुपे हे शहिद झाले होते.
बंद जलवाहिनीला शिवसेनेने कायमच विरोध केला आहे. पवना आंदोलनात शहीद झालेल्या शेतकऱ्यांच्या १४ व्या पुण्यस्मरण दिनानिमित्त त्यांच्या स्मृतीस शिवसेना मावळ तालुका(शिंदे गट) यांनी येळसे येथील स्मृतिस्थळावर गुरुवार दिनांक ७ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी १०: वाजता शहीद झालेल्या शेतकऱ्यांना आदरांजली अर्पण करून पवना बंद जलवाहिनीला आमचा तीव्र विरोध आज देखील आहे. ही बंद जलवाहिनी कायमचीच रद्द करावी .
शेतकऱ्यांच्या जमिनीवरील शिक्के काढावे. आंदोलनातील जखमींना शासकीय नोकरी द्यावी.अशी आमची आग्रही मागणी आहे. यावेळी शिवसेना मावळ तालुका प्रमुख राजेश खांडभोर, उपजिल्हाप्रमुख शरद हुलावळे, जिल्हा संघटक अंकुश देशमुख, शिवसेना मावळ तालुका राजेश वाघोले, मावळ तालुका संघटक अमित कुंभार, चंद्रकांत भोते, उप तालुकाप्रमुख राम सावंत, युवा लोकसभा अध्यक्ष विशाल हुलावळे, भारतीय विद्यार्थी सेना धनंजय नवघणे उपस्थित होते.
प्रतिनिधी : गणेश नामदेव भेगडे. ९९२१८०७०११




















