एक गाय व दोन बैलांना भूल देऊन पळून नेण्याचा कसायांचा डाव जागरूक गोरक्षक व नागरिकांमुळे फसला
लोणावळा: शहरालगत असणाऱ्या डोंगरगाव मध्ये रविवार दिनांक १ जून २०२५ रोजी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास पाळीव एक गाय व दोन बैलांना भूल देऊन पळून नेण्याचा कसायां चा प्रयत्न जागरूक गोरक्षक व नागरिकांमुळे फसला. तीनही पाळीव जनावरांना जीवदान मिळाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत अशी माहिती गोरक्षक माऊली आंद्रे यांनी दिली आहे.
मागील काही दिवसात हिंदू राष्ट्र सेना व बजरंग दल संघटने कडून कत्तलखान्यात घेऊन जाणाऱ्या अनेक जनावरांना संघटनेमुळे व जागृत गोरक्षकांमुळे जीवदान मिळाले आहे. सुमारे ५६ हजार टन गोमासाने भरलेले दोन कंटेनर मागील काही दिवसांपूर्वी लोणावळ्यात पकडण्यात आले होते.
स्थानिक नागरिकांनी जागरूक राहून आपल्या आजूबाजूला असे काही प्रकार घडत असतील तर गोरक्षकांना तत्काळ याची सूचना द्यावी असे आवाहन करण्यात आले आहे. या कारवाईसाठी सरपंच सुनील येवले, संजय तिखे, डाॅ. सागर लोखंडे, माऊली अंद्रे, शिवदुर्ग रेस्क्यू टीमचे सुनील गायकवाड, दिनेश पाठारे, शैलेश धरपाळे, मयूर खैर, अक्षय ठुले, संकेत निकम, चंद्रकांत बोंबले, अजय शेळवणे यांचे मोलाचे सहकार्य या कारवाईसाठी लाभले या कारवाई त सहभागी सर्व गोरक्षकांचे तालुक्यात कौतुक होत आहे.
प्रतिनिधी : गणेश नामदेव भेगडे. ९९२१८०७०११




















